रामजन्मभूमीवर अन्य धार्मिक स्थळ उभेच राहू शकणार नाही - उमा भरतीची वादग्रस्त भूमिका
दिल्ली (सह्याद्री बुलेटिन ) - आम्ही रामभक्त आहोत तेव्हा रामजन्मभूमीवर अन्य धार्मिक स्थळ उभेच राहू शकणार नाही, असे मत भाजपच्या केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले आहे.
न्यायालयाकडून आधीपासूनच असे सांगण्यात आले आहे की, रामजन्मभूमी हा आस्थेचा वाद नसून जमिनीचा वाद आहे. जमिनीचा वाद असल्यास दोन्ही पक्षांमध्ये जर सामंजस्याने एक निर्णय घेतला तर तो न्यायालयास मान्य असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पद्धतीनुसार काम केले आहे. तसेच व्हेटिकन सिटीमध्ये मस्जिद उभी राहू शकत नाही, मक्का-मदिन्यात मंदिर बनू शकत नाही, त्याच प्रमाणे रामलल्ला जिथे आहेत तिथे दुसरे कोणते धार्मिक स्थळ उभे राहू शकणार नाही. असे भारती म्हणाल्या.