अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन नक्की कधी झाले ?. शिवसेनेचा सवाल...

(सह्याद्री बुलेटिन ) - अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली होती, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२-१३ ऑगस्टपासून मंदावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच्या भाषणात अडथळा येऊ नये, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको या विचाराने वाजपेयी यांनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला किंवा त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी ‘सामना’त लिहिलेल्या लेखातून वाजपेयींच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली आहे.
दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी घुसलेले अतिरेकी पकडण्यात पोलिसांना यश आले की समजावे, स्वातंत्र्य दिन जवळ आला आहे. या वेळीही परंपरेप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उधळून लावण्यासाठी दिल्लीत घुसलेल्या १० अतिरेक्यांना अटक झाली. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा पकडला गेला. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी बेडरपणे स्वातंत्र्य दिन साजरा केला, असा टोला त्यांनी लगावला.

 

Review