राहुल गांधी,गुलाम नबी आझाद हे विजय मल्ल्याचे रक्षक?

विजय मल्ल्या सभ्य माणूस आहे याच्याविरोधात तक्रार दाखल करू नका असे सांगत राहुल गांधी यांनी माझ्यावर दबाव आणला होता असा आरोप शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी यांनी केला आहे.
विजय मल्ल्या पळून जाणार हे अरूण जेटलींना आधीच ठाऊक होते असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आता या वादात शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी यांनीही उडी घेतली आहे.राहुल गांधी आणि गुलाम नबी आझाद या दोन्ही नेत्यांनी माझ्यावर विजय मल्ल्याविरोधात एफआयआर दाखल करू नये म्हणून दबाव आणला होता. मेरठजवळ शिया वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर विजय मल्ल्याने कब्जा केला होता. याप्रकरणी मला तक्रार दाखल करायची होती. मात्र मी असे करू नये असे मला दोन्ही नेत्यांनी सांगितले आणि माझ्यावर दबाव आणला असा आरोप रिझवी यांनी केला. मी शांत राहिल्याने त्यावेळी विजय मल्ल्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असेही रिझवी यांनी म्हटले आहे. आम्हाला ही अशी माहिती मिळाली होती की शिया वक्फ बोर्डाच्या बळकावलेल्या जमिनीवर विजय मल्ल्या दारूची फॅक्ट्री उघडणार आहे. त्यामुळे आम्ही त्याला तसे न करण्यासंबंधीची नोटीस बजावली होती असेही रिझवी यांनी म्हटले आहे.

Review