संघाने केली राहुल गांधी यांची प्रशंसा, काँग्रेस चे अच्छे दिन आयो रे भैया...

कॉंग्रेसला मेहनत करणारा नेता मिळाला आहे. ही कॉंग्रेससाठी चांगली गोष्ट आहे. लोकशाहीत दोन प्रमुख पक्ष प्रबळ राहण्याची आवश्‍यकता आहे. एका पक्षाचा प्रभाव हा लोकशाहीसाठी हितकारक नाही. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांमध्ये कॉंग्रेसचा विजय हा लोकशाही सुदृढ असल्याचे लक्षण आहे. एकाच पक्षाची फार काळ सत्ता राहणे योग्य नाही. यातून लोकशाही सबळ होत नाही. अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख व विचारवंत मा. गो. वैद्य यांनी तीन राज्यांच्या निवडणुकीचे विश्लेषण केले.
गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपच्या आयटी सेलद्वारे तसेच संघ परिवारातून टिकेची झोड उठविली जात होती. त्यांच्यावर उपहासात्मक व चारित्र्यहणन करणाऱ्या पोस्ट सोशल मिडियावर टाकल्या जात होत्या. तसेच त्यांच्या नेतृत्वाबद्दलही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे.

Review