लढाऊ विमान राफेल घोटाळ्यात मोदींना कोणीही वाचवू शकत नाही – राहुल गांधी

मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)– लढाऊ विमान राफेल घोटाळयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही वाचवू शकत नाही. मोदींनी रिलायन्सच्या अनिल अंबानींना व्यक्तीगत फायदा मिळावा यासाठी हा घोटाळा केला आहे. या आरोपांचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला आहे. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना राफेल प्रकरणाची चौकशी करायची होती. म्हणून त्यांना मध्यरात्री तात्काळ पदावरुन हटवले. असेही ते म्हणाले. यासाठी मोदी लोकसभेत चर्चेपासून पळ काढाला असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

फ्रान्सकडून राफेल फायटर विमान मिळण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डासू एव्हिएशनला २० हजार कोटी रुपये दिले. पण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची देणी द्यायला ते नकार देतात या शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राफेल विमान मिळण्याआधीच पंतप्रधान मोदींनी डासूला २० हजार कोटी दिले पण एचएएलला १५,७०० कोटी रुपये द्यायला ते नकार देतात. त्यामुळे एचएएलला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एक हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागते असे राहुल गांधी म्हणाले. पैसे न देऊन एचएएलला कमकुवत करण्याची सरकारची रणनिती आहे. एचएएलच्या रुपाने भारताची रणनितीक क्षमता नष्ट करुन त्यांना अनिल अंबानींना गिफ्ट द्यायचे आहे. हाच त्यांचा कट असून जो आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहोत असे राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

Review