पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानच्या धमकीनंतर; हिंदुस्थानात घडामोडींना वेग,दिल्लीत तातडीची बैठक

नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)-पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या सरकारने कडक धोरण स्वीकारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पाकिस्तानातील हिंदुस्थानचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्यामध्ये बैठक पार पडली.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदुस्थानला पोकळ धमक्या दिल्या. यानंतर पाकिस्तानातील हिंदुस्थानचे उच्चायुक्त अजय बिसारिया हे बुधवारी गृह मंत्रालयात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. बिसारिया यांच्यासह अमेरिकेतील हिंदुस्थानचे उच्चायुक्त हर्षवर्धन श्रींगला हे देखील गृहमंत्रालयात पोहोचले असून त्यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेत चर्चा केली. या बैठकांमध्ये काय झाले याबाबत माहिती सध्या उपलब्ध झालेली नाही. परंतु पुलवामा हल्ला आणि पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी पुढील पाऊल काय असावे याबाबत चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे.

Review