अभिनंदनला भारतात आणा, सभा, भाषणे नंतर द्या - विरोधी पक्षांचा मोदींना सल्ला
मुंबई ( सह्याद्री बुलेटिन ) - देशाच्या पंतप्रधानांना अभिनंदनला सोडवण्यापेक्षा पक्षाचे हित जास्त महत्वाचे वाटते आहे म्हणून ते देशातील भाजपाच्या १५ हजार बुथवर अध्यक्षांशी आज संवाद साधत आहेत, मोदींनी अभिनंदनला भारतात आणावे, सभा, भाषणे नंतर द्यावीत असा सल्ला विरोधी पक्ष मोदींना देत आहे.
भारताने पाकिस्तानचे एफ 16 लढाऊ विमान पाडले मात्र त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे.
आपला जवान अभिनंदन पाकिस्तानमधून परत येण्याची जास्त गरज आहे. त्यासाठी देश आणि पंतप्रधानांनी प्रयत्न केला पाहिजे परंतु देशाचे पंतप्रधान भाजपच्या बुथ कमिटीच्या भारतातील अध्यक्षांचा मेळावा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. पुलवामाचा हल्ला झाला त्यावेळीसुद्धा नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षाच्या सभा घेत फिरत होते असंही विरोधकांनी म्हटलं आहे.