केजरीवाल यांनी दिल्ली सोडून जाण्याची तयारी करावी - दिल्ली भाजपचे माजी अध्यक्षाचा सल्ला

दिल्लीत असं सरकार हवं आहे, जे केंद्राच्या सोबतीने काम करेल, पुढील सहा महिन्यात दिल्लीत सत्तांतर निश्चित असून केजरीवाल यांनी दिल्ली सोडून जाण्याची तयारी करावी, असं मत दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष विजय गोयल यांनी व्यक्त केले. दिल्लीत वरिष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात विजय गोयल बोलत होते. दिल्ली सरकारचा केंद्र सरकारसोबत ताळमेळ नसल्यामुळे येथील जनतेचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्याता व्यवस्थीत ताळमेळ असणे आवश्यक आहे. दरम्यान पुढील सहा महिन्यात दिल्लीत सत्तांतर होणार असून आम आदमी पक्ष पराभूत होणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी आताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शरण जावे असा टोला विजय गोयल यांनी लागवला.

Review