'जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी' मी नानांसोबत - मकरंद अनारसपुरे
तनुश्री प्रकरणात मी नाना पाटेकर यांच्या पाठी उभा आहे. नाना गेली पाच दशकं या क्षेत्रात काम करत आहे त्यांच्यावर कोणीही बोट दाखवलं नाही, त्यांचा स्वभाव रागीट आहे हे मी मान्य करतो पण त्यालाही कारणं आहेत. तनुश्रीनं दहा वर्षांनंतर पुन्हा तेच आरोप नानांवर करणं चुकीचं आहे. तिच्या आरोपामागचा बोलवता धनी कोण आहे हे शोधलंच पाहिजे.असं म्हणत मकरंद अनासपुरे यांनी नानांची पाठराखण केली आहे. आणि कलाकारांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे असेही ते म्हणाले...
सत्य सर्वांना ठावूक आहे पण ते योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे त्यामुळे मी जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी नानांसोबत आहे. नाना पाटेकर यांनी चित्रपटसृष्टीसाठीचं नाही तर देशासाठीही मोलाचं योगदान दिलं आहे, त्यामुळे त्यांच्यापाठी मी सदैव उभं राहणार’, असं मत मकरंद अनासपुरे यांनी मांडलं आहे.